breaking-newsराष्ट्रिय

दिल्ली मेट्रोच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ५० टक्क्यांची कपात

नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या दिल्ली मेट्रोने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ५० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑगस्टपासून मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना ५० टक्के कमी पगार मिळणार आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे दिल्ली मेट्रो जवळपास ५ महिने बंद आहे. त्यामुळे मेट्रोचे उत्पन्नही बंद आहे. असे असताना दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांचे पगार आणि कर्जाचे हप्ते द्यावे लागत आहेत. मात्र उत्पन्नच मिळत नसल्याने हे पैसे देणे दिल्ली मेट्रोला अवघड जात आहे. २२ मार्च रोजीचा जनता कर्फ्यू आणि त्यानंतर २५ मार्चपासून सुरु झालेला लॉकडाऊन यामुळे दिल्ली मेट्रो बंद आहे. म्हणून मेट्रोने कर्मचाऱ्यांच्या पगार आणि भत्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रोने घेतलेला हा निर्णय पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button