breaking-newsराष्ट्रिय
दिल्लीत आगीचं तांडव, ४३ जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/fire-frame-1.jpg)
महाईन्यूज | दिल्ली
राजधानी दिल्लीमध्ये एका फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या आगीत होरपळून ४३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली आहे. या भीषण आगीमधून शेकडो लोकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीत अनेकजण जखमी झाले असून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील राणी झांशी रोडजवळील अनाज मंडीतील एका फॅक्ट्रीला सकाळी अचानक भीषण आग लगाली आहे. या आघीत आतापर्यंत ४३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण आगीत गंभीर भाजलेल्यांना सफदरजंग आणि एलएनजेपी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.