जागतीक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा ; भारतीय नेमबाजांची धडाकेबाज सुरुवात
चॅंगवॉन (दक्षिण कोरिया)- आगामी रिओ ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या जागतीक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी धडाकेबाज सुरुवात करताना पहिल्याच दिवशी 2 सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
स्पर्धेतील ज्युनिअर खेळाडूंच्या गटात भारताने 2 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. 50 मी. पिस्तुल प्रकारात भारताच्या अर्जुनसिंह चिमाने सुवर्णपदकाची कमाई केली, याचसोबत सांघिक प्रकारातही अर्जुनने आपले सहकारी गौरव राणा आणि अनमोल जैन यांच्यासोबत सुवर्णपदक पटकावलं. तर गौरवने वैय्यक्तिक प्रकारातही कांस्यपदक आपल्या नावे केलं. भारताच्या सिनीअर खेळाडूंना मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही.
2020 मध्ये टोकियात होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी या स्पर्धेतून खेळाडूंना प्रवेश मिळणार आहे, त्यामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडू कसे खेळ करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दुसरीकडे 10 मी. एअर रायफल मिश्र प्रकारात भारताच्या अपुर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने पात्रता फेरीत सातवं स्थान पटकावलं. 0.4 गुणांच्या फरकाने भारतीय जोडीला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नाही. याचसोबत दिपक कुमार-मेहुली घोष, हिना सिद्धु-शाहझार रिझवी, मनू भाकेर-अभिषेक वर्मा जोडीलाही अपयशाचा सामना करावा लागल्याने चाहत्यांमध्ये निराशा पसरली.
सामन्यात गौरवने सुवर्णपदकाची कामगीरी करताना 559 गुण मिळवले तर त्याच्या पाठोपाठ कोरियाच्या वूजॉंग किमने 554 गुण मिळवत कांस्य पदक आपल्या नावे केले. तर सांघीक प्रकारात अर्जुन, गौरव आणि अनमोलयांनी 1659 गुण कमावताना सुवर्णावर नाव कोरले तर कोरियाच्या संघाला 1640 गुण मिळवता आल्याने त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.