breaking-newsराष्ट्रिय
चिथावणीखोर संदेशप्रकरणी व्हॉट्सऍपला केंद्र सरकारचा इशारा
नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर अफवा पसरवणारे संदेश पाठवण्यात आल्याने जमावाकडून अमानुषपणे मारहाण करत काहींचा मृत्यू झाल्याने केंद्र सरकारकडून व्हॉट्सऍपला निर्देश देण्यात आले आहेत. गैर जबाबदार आणि विस्फोटक संदेश पसरवल्याप्रकरणी व्हॉट्सऍपची मालकी असणाऱ्या फेसबुकवर कारवाई करण्यात येईल असे इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र, आसाम, कर्नाटक, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये अशा हत्या झाल्या असून त्या दुखःद आहेत. व्हॉट्सऍपचा गैरवापर करणे ही चिंताजनक बाब आहे. बनावट, भडकावू आणि अफवा पसरविणाऱया संदेशाविरोधात कंपनीने कारवाई करावी, असे सरकारकडून सांगण्यात आले.