breaking-newsराष्ट्रिय
उत्तर प्रदेश मध्ये वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास १० हजार दंड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/download-5-1.jpg)
लखनऊ – वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आता वाहतुकीच्या नियमात सुधारणा करून दंडाच्या रक्कमेत वाढ केली आहे. त्यात वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना सापडल्यास पहिल्यांदा १ हजार आणि नंतर थेट १० हजार अशा दंडाची तरतूद केली आहे. हा नियम दुचाकीलाही लागू आहे.
विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यास हजार रुपये आणि पार्किंगच्या नियमाचे उल्लंघन केल्यास पहिल्यांदा ५०० रुपये आणि नंतर हजार रुपये अशी दंडाची तरतूद केली आहे. विनाबेल्टसाठी हजार रुपये, विना लायसन आणि अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास ५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्यास २ हजार रुपये आणि मालवाहू गाडीतून प्रवाशांची वाहतूक करणाऱ्याला ४ हजार रुपये दंड करण्याची तरतूद उत्तर प्रदेश सरकारने केली आहे.