breaking-news
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने उद्या शेतकरी सन्मान दिन : माजी खासदार राजू शेट्टी
कोल्हापूर । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मध्ये शेतकरी “कोरोना अन्नदाता योध्दा” च्या रूपात कैकपटीने नुकसान सोसून देखील देशातील नागरिकांना अन्न पुरवले. तसेच पुढील काळासाठी देशातील अन्नधान्याच्या कोठारात भरणा देखील केला. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सामाजिक सुरक्षितता राखून १६ मे रोजी सकाळी ९ वाजता आपल्या अंगणात, घरावर अथवा घराजवळील योग्य ठिकाणी देशाचा राष्ट्रध्वज, संघटनेचा झेंडा अथवा कोणतेही कृषी औजार ५ ते १० मिनिट लावून धरून शेतकर्यांचा सन्मान करूया तसेच त्यांच्या या लढ्याला आपण पाठिंबा देऊया, असे आवाहन माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.