अंतिम परीक्षेसंदर्भातील निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला
![The Supreme Court is ready to hear the petitions of 10th and 12th class students](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/suprim-court-1.jpg)
नवी दिल्ली – महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत आज (१८ ऑगस्ट) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, विद्यापीठाला युजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील निर्देशांविरोधात याचिकेवरील निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल ३० सप्टेंबरपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. येणाऱ्या ३ दिवसात सर्व याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे लेखी स्वरुपात सुप्रीम कोर्टात मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोविड-१९ संदर्भात महाराष्ट्रातील परिस्थिती भयानक आहे. दुसर्या वर्षाच्या विद्यार्थ्याला पदवी द्यावी असं महाराष्ट्र सरकारने म्हटलं नाही. फक्त अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांबाबत सरकारची ही भूमिका आहे. स्थानिक परिस्थितीचा विचार न करता ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम परीक्षा घेण्याची यूजीसीने दिलेली सूचना मनमानी आणि अवास्तव आहे ,’ असं म्हणत दातार यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली