‘देशात सर्वाधिक कंडोम मुस्लीम लोक वापरतात..’; असदुद्दीन ओवैसींचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर
Asaduddin Owaisi | काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल, असं विधान पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमधील एका सभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरून एआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ते हैदराबादमध्ये सभेत बोलत होते.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, पंतप्रधान मोदी खोट बोलत असून ते देशात मुस्लीम आणि दलितांविरोधात द्वेष पसरवण्याचं काम करत आहे. ही मोदी गॅरंटी आहे. पंतप्रधान म्हणतात की देशात मुस्लीम लोक सर्वाधिक मुलं जन्माला घातलात. पण नरेंद्र मोदी यांना सहा भाऊ आहेत, तर अमित शाहा यांनाही सहा बहिणी आहेत. तरीही हे लोक मुस्लिमांच्या मुलांबाबत बोलतात.
‣ @narendramodi की एक ही गारंटी है, दलितों और मुसलमानों से नफ़रत करो।
‣ एक मुल्क का वज़ीर-ए-आज़म इस मुल्क की 15 फ़ीसद अवाम को घुसपैठिया कहता है, इससे शर्मनाक बात कुछ और नहीं हो सकती। pic.twitter.com/87mIdAfiAi
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 27, 2024
हेही वाचा – ऐन उन्हाळ्यात महागाईचा चटका, डाळी भाव कडाडले; जाणून घ्या नवे दर
मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार देशात मुस्लिमांचा प्रजनन दर सर्वात कमी आहे. तसेच दिवसेंदिवस मुस्लिमांची लोकसंख्याही घटत आहे. महत्त्वाचे म्हणजे देशात सर्वाधिक कंडोम कोण वापरत असेल तर ते मुस्लीम लोक वापरतात, असे मी म्हणत नाही, तर मोदी सरकारची आकडेवारी सांगते. मात्र, तरीही मुस्लीम लोक जास्त मुलं जन्माला घालतात, असे मोदी म्हणत आहेत. याचं कारण भाजपा आणि संघाच्या लोकांना हिंदूंच्या मनात भीती निर्माण करायची आहे. एका विशिष्ट काळात देशात मुस्लिमांची संख्या हिंदूपेक्षा जास्त होईल, अशी भीती ते हिंदुंना दाखवतात. मात्र, असं कधीही होणार नाही, असं ओवैसी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
आधी जेव्हा त्यांचं (काँग्रेस) सरकार होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार का? तुम्हाला हे मान्य आहे का? काँग्रेसचा जाहीरनामाच हे सांगतोय की ते देशातील महिलांकडच्या सोन्याचा हिशोब घेतील आणि नंतर ती संपत्ती वाटून टाकतील. मनमोहन सिंग सरकारनं म्हटलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचं मंगळसूत्रही वाचू देणार नाहीत, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.