ताज्या घडामोडीपुणे

अजित पवार यांनी दादा स्टाईलने राज ठाकरेंना प्रत्युत्तर

इंदापूर (पुणे) | शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं किंबहुना राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या पाडवा मेळाव्यात बोलताना केली. त्यांच्या टीकेला खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज ठाकरेंना दादा स्टाईलने उत्तर दिलंय. “व्वा रं पठ्ठ्या… साहेबांचं सगळं राजकारण बघितलं तर कुठे जातीयवादी राजकारण दिसणार नाही. त्यांनी सर्व धर्म समभावाचं राजकारण केलं. पण हा पठ्ठ्या म्हणतो, जातीचं राजकारण केलं, काय बोलावं आता…”, अशा शब्दात खास दादा स्टाईलमध्ये अजित पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या पाडवा मेळाव्यात सुमारे तासभर झंझावाती भाषण केलं. आपल्या भाषणात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर तुटून पडले. राष्ट्रवादीच्या नवाब मलिक आणि छगन भुजबळांचा समाचार घेतला तर राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचं राजकारण जातीयवादी असल्याचा पुनरुच्चार करुन लोकांची ठाम भूमिका नसल्याने राजकारणी तालावर नाचवत असल्याची टीका केली. राज यांच्या भाषणावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

अजित पवारांकडून खास दादा स्टाईलने राज ठाकरेंना प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापुरात आहेत. इंदापुरात आज अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडतो आहे. याच मेळाव्यात बोलताना त्यांनी शरद पवार यांचा द्रष्टेपणा सांगताना राज ठाकरेंची कानउघाडणी केली. “पवारसाहेबांनी त्यांचं सगळं राजकारण करताना सर्व धर्म समभाव सांभाळला. सगळ्या जातीधर्मातील लोकांना नेतृत्व करण्याची संधी दिली आणि हा पठ्ठ्या म्हणतो, जातीपातीचं राजकारण केलं, काय बोलावं आता…..”, असं अजित पवार म्हणाले.

“कुणीही सांगावं साहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं. साहेबांचे पहिल्यापासून ते आतापर्यंतचे निर्णय काढून बघा ना, त्यामध्ये कुणीही दाखवावं, त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं… प्रत्येकवेळी त्यांनी सर्व धर्म समभाव हीच भूमिका ठेऊन मार्गक्रमण केलं. शरद पवारांच्याभोवती राजकारण फिरतं, म्हणून ही टीका होते”, असंही अजित पवार म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याचंही म्हटलं. राज यांच्या या आरोपावरही संजय राऊतांनी त्यांना टोमणा हाणला. “तुम्हीही पवारांच्या चरणाजवळ सल्लामसलत करण्यासाठी जात होताच की… कशाला उगीच आपण टोलेजंग माणसावर बोलायचं”, असं राऊत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button