२०० पेक्षा अधिक तालिबानी कैद्यांना काबुलने सोडले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/ghani-afgan-president-new.jpg)
किमान १७० तालिबानी कैद्यांना पुल-ए-चरखी येथून मुक्त करण्यात आले आहे. तर, अन्य १३० तरूंग कैद्यांना देखील काबुल येथुन मुक्त करण्यात येत आहे. साधारण दोन दशकांच्या अफगाणिस्तानातील गृहयुद्धानंतर शांततेसाठी चर्चा सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
टोलो वृत्तसंस्थेने अफगाणिस्तान सरकारच्या एका सरकारी सुत्राच्या हवाल्याने या संदर्भात बातमा दिली आहे. सोडण्यात आलेल्या कैद्यांवर तालिबनाचे सदस्य असल्याचे व तालिबानला सहकार्य केल्याचे आरोप होते. तालिबान कैद्यांच्या मुक्ततेची घोषणा राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी मे महिन्यात पार पडलेल्या एका शांतता परिषदेच्या समारोपानंतर केली होती. या परिषदेचा समारोप ३ मे रोजी झाला होता. त्यावेळी तालिबानबरोबर शांततापुर्ण संबंध ठेवले जाईल व १७५ तालिबानी कैद्यांची पवित्र रमजानच्या आठवड्याअगोदर मुक्ताता केली जाईल, असे राष्ट्राध्यक्ष घनी यांनी आश्वासान दिले होते.
यानंतर ईद-अल-फितर च्या दिवशी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी ८८७ कैद्यांची मुक्ताता करत असल्याचे घोषित केले होते. तर टीकाकारांनी असे म्हटले आहे की या निर्णयामुळे देशाच्या नाजूक स्थितीवर संभाव्य नकारात्मक प्रभाव पडेल आणि कोणतीही सल्लामसलत केल्याशिवाय हा निर्णय घेण्यात आला आहे. या अगोदर तालिबानने अफगान सरकारशी प्रत्यक्ष चर्चा करण्यास सतत नकार दिला होता.