पुलवामा हल्ला ही दुर्घटना, दिग्विजय सिंह यांचे विधान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/0521_digvijay_730_1.jpg)
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या एका टि्वटमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना ठरवले आहे. भारतीय हवाई दलाने बालकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले त्याची आकडेवारी मागणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला ‘दुर्घटना’ म्हटले आहे.
किन्तु पुलवामा दुर्घटना के बाद हमारी वायु सेना द्वारा की गयी “Air Strike" के बाद कुछ विदेशी मीडिया में संदेह पैदा किया जा रहा है जिससे हमारी भारत सरकार की विश्वसनीयता पर भी प्रश्न चिन्ह लग रहा है।
— digvijaya singh (@digvijaya_28) March 5, 2019
दिग्विजय सिंह यांनी एकापाठोपाठ एक टि्वट करुन नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना ठरवले आहे. पुलवामा दुर्घटनेनंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर परदेशी प्रसारमाध्यमे शंका घेत आहेत. ज्यामुळे भारत सरकारच्या विश्वसनीयतेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
प्रधान मंत्री जी आपकी सरकार के कुछ मंत्री कहते हैं ३०० आतंकवादी मारे गये भाजपा अध्यक्ष कहते हैं २५० मारे हैं, योगी आदित्यनाथ कहते हैं ४०० मारे गये और आपके मंत्री SS Ahluwalia कहते एक भी नहीं मरा।और आप इस विषय में मौन हैं। देश जानना चाहता है कि इसमें झूठा कौन है।
— digvijaya singh (@digvijaya_28) March 5, 2019
पंतप्रधान मोदी तुमच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री ३०० दहशतवादी मारल्याचे सांगतात. भाजपा अध्यक्ष २५० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगतात. योगी आदित्यनाथ ४०० तर तुमचे मंत्री अहलुवालिया एकही दहशतवादी मारला नाही असे सांगतात. तुम्ही यावर मौन बाळगले आहे. नेमकं खोटं कोण बोलतय ते देशाला कळलं पाहिजे असे दिग्विजय यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
मोदी जी सवाल ना सियासत का है ना सत्ता का। सवाल उन बिलखती बहनों का है जिन्होंने अपने भाई खोए हैं सवाल उस मॉं का है जिसके लाड़ले की शाहदत हुई है और सवाल उस वीरांगना का है जिसने अपना पति खोया है। इनके सवालों का जवाब आप कब देंगे?
— digvijaya singh (@digvijaya_28) March 5, 2019
हा राजकारण आणि सत्तेचा विषय नाही. बहिणीने तिचा भाऊ, आईने तिचा मुलगा तर पत्नीने तिचा पती गमावला आहे. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही कधी देणार ? असा सवाल त्यांनी टि्वटमधून मोदींना विचारला आहे.
आप, आपके वरिष्ट नेता व आपकी पार्टी सेना की सफलता को जिस प्रकार से भाजपा केवल अपनी सफलता साबित कर चुनावी मुद्दा बनाने का प्रयास कर रहे हैं वह हमारे देश के सुरक्षा कर्मियों की बहादुरी और समर्पण का अपमान है। देश का हर नागरिक भारतीय सेना व समस्त सुरक्षा कर्मियों का सम्मान करता है।
— digvijaya singh (@digvijaya_28) March 5, 2019
सैन्याच्या यशाला भाजपा आपले यश दाखवून निवडणुकीतील मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हा आपल्या देशातील सैनिकांच्या शौर्याचा अपमान आहे. देशातील प्रत्येक नागरिक भारतीय सैन्य आणि सुरक्षा दलांचे सन्मान करतात असे दिग्विज यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.