Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा पहिल्याच दिवशी ठाण्यातील खोपट एसटी डेपोत पहिला पाहणी दौरा

मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्री पद मिळाल्यानंतर सरनाईक पहिल्याच दिवशी ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले पाहायला मिळाले. प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोत आपला पहिला पाहणी दौरा करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान डेपोतील दुरावस्था,अस्वच्छता पाहून सरनाईक यांनी पहिल्याच दिवशी नाराजी व्यक्त केली.

त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 फेब्रुवारी रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा व आगार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारणा करिता काही सूचना दिल्या होत्या, त्याची अद्यापही प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नसल्याने सरनाईक यांनी खोपट एसटी डेपोतील अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. यावेळी पहिल्याच दिवशी कारवाई करणं योग्य नसल्याने एक महिन्यांचा कालावधी दिल्याचं सरनाईक यांनी म्हटल आहे. त्याचबरोबर मला मिळालेलं मंत्रीपद हे श्रद्धा सबुरीच फळ असल्याच्या भावना देखील सरनाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा –  ‘मी माझ्या कुटुंबासाठी काम करतो माझं कुटुंब 140 कोटी जनतेचं…’; पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवसेना शिंदे गटाकडून 11 आमदारांनी गेल्या आठवड्यात नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही महत्त्वाची खाती तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा मंत्रालये देण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि शालेय शिक्षण यासारखी महत्त्वाची खाती अनुक्रमे प्रकाश आबिटकर आणि दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. भरत गोगावले यांच्याकडे परिवहन, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता, संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण, पर्यटन, खाणकाम, शंभूराज देसाई यांच्याकडे माजी सैनिक कल्याण आणि संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कॅबिनेट मंत्रिपदांव्यतिरिक्त, पक्षाला राज्यमंत्रीपदेही मिळाली आहेत. आशिष जैस्वाल यांच्याकडे वित्त आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, कायदा आणि न्यायव्यवस्था, कामगार, योगेश कदम यांना गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न या खात्यांचे राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. नवीन सरकारमध्ये नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शिवसेनेला मिळाले आहे. शिवसेनेने पाच जणांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तर तीन जणांना मंत्रिमंडळातुन वगळले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button