breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

केंद्रातील भाजप सरकार ४ महिन्यातच बदलणार, जयंत पाटील यांना विश्वास

मुंबई | लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं. सध्या केंद्रात एनडीए आघाडीचं सरकार असल्याने हे सरकार कधीही कोसळू शकतं, अशी टीका विरोधक करतात. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही एनेकदा टीका करताना केंद्रातील एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं, असं म्हटलं होतं. यानंतर आता शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्रातील एनडीए सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. ते साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, पुढच्या चार महिन्यात केंद्रातील सरकार बदलणार आहे. त्यानंतर काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत जातील. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा अनेक वर्षांचा कार्यकाळ दिल्लीत घालवलेला आहे. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल. मी देखील इंडिया आघाडीचा एक सदस्य आहे. त्यामुळे हे सांगत आहे, असं ते म्हणाले.

हेही वाचा      –      ‘मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यापेक्षा २८८ जागा लढवल्या पाहिजेत’; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला 

दरम्यान, तकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला. जयंत पाटील यांना या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तसेच काँग्रेसचेही काही मते फुटल्याचं बोललं जातं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button