breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यापेक्षा २८८ जागा लढवल्या पाहिजेत’; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

मुंबई | मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आहे. ते पुन्हा उपोषणाला बसण्याची शक्यता आहे.यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना प्रकाश आंबेडकर यांनी एक राजकीय सल्लाही दिला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना माझं सांगणं आहे की, त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत भूमिका जाहीर केली होती. आता त्यांनी २८८ जागांवर विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. ते लढतील अशी माझी अपेक्षा आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं, ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीसंदर्भात राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अशा आशयाचे पत्र द्यायचं असं सर्वपक्षीय बैठकीत ठरलं होतं. ते पक्ष सर्वांनाच पाठवायचं आहे. मात्र, अद्याप तरी वंचित बहुजन पार्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पत्र आलेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करावा आणि ते कधीपर्यंत पत्र पाठवणार आहेत हे सांगावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा     –      राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्यासह २१ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची जी मत फुटलेली आहेत. तसेच महाविकास आघाडीमधील इतर पक्षाची मतेही फुटलेली आहेत. पाच मते काँग्रेसची फुटली आहेत आणि इतर दोघांची एक-एक मत फुटलेली आहेत. पण सातही फुटलेल्या मतांचं खापर काँग्रेसवर फोडलं जात आहे. काँग्रेसचे जे फुटलेले आमदार आहेत, त्यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करणार? याचा खुलासा केला पाहिजे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button