‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कायद्याचे राज्य संपवले’; राहुल गांधी
नवी दिल्ली : भाजपशासित मध्य प्रदेशात एका दलित कुटुंबावरील अत्याचाराचा संदर्भ देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी आरोप केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ‘कायद्याचे राज्य’ संपवले आहे. भाजपच्या नेत्यांनी मध्य प्रदेशातील या दलित कुटुंबावर जे अत्याचार केले ते मनला वेदना आणि संताप निर्माण करणारे आहे.
ही शरमेची बाब आहे की भाजपच्या राजवटीत सरकार पीडित महिलांऐवजी ते नेहमीच गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहतात, असे राहुल गांधी यांनी एक्सवरील एका हिंदी पोस्ट मध्ये म्हटले आहे.
मध्य प्रदेशातील सागर येथील अंजना अहिरवार यांच्या कुटुंबावर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाच्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे. छेडछाडीच्या प्रकरणात तडजोड करण्यासाठी काही लोकांनी तिच्यावर दबाव टाकून तिच्या भावाला अमानुष मारहाण केली. ऑगस्टमध्ये अंजना अहिरवारने गुन्हा दाखल केला होता, रविवारी सागर येथे तिच्या मामाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेतून पडून तिचा मृत्यू झाला. जुन्या वैमनस्यातून शनिवारी रात्री अंजनाच्या काकांनाही काही लोकांनी बेदम मारहाण केली होती.
हेही वाचा – कडाक्याच्या उन्हात आनंदाची बातमी, ‘मान्सून’बाबत IMDकडून महत्वाची अपडेट
स्थानिक भाजप नेत्यांकडून तिच्या कुटुंबाचा छळ करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणाच्या संबंधात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की मी तुम्हाला खात्री देतो की आम्ही अशी व्यवस्था निर्माण करू जिथे सर्वात कमकुवत व्यक्ती देखील अत्याचाराविरुद्ध जोरदार आवाज उठवू शकेल. आम्ही पैसा आणि शक्तीच्या बळावर अन्याय करणाऱ्यांना प्रतिबंध करू असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अंजना अहिरवारवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप काँग्रेसने यापूर्वी केला होता आणि हा प्रकार कोणालाही न सांगण्याची धमकी अंजनाला देण्यात आली होती. आधी भाजपच्या नेत्यांनी या दलित मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिला हे कोणाला सांगू नकोस, अशी धमकी ते देत राहिले.
घाबरलेल्या मुलीने ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना सांगितली आणि नंतर खूप प्रयत्नांनंतर एफआयआर दाखल करण्यात आला. यानंतर भाजप नेत्यांनी तडजोडीसाठी दलित कुटुंबावर दबाव टाकला असता, मुलीची आई मध्यस्थी करण्यासाठी आल्यावर तिला विवस्त्र करून भाजप नेत्यांनी मारहाण केली.
हे नेते तडजोडीसाठी कुटुंबावर खूप दबाव आणत होते,असे काँग्रेसने अधिकृत एक्स हँडलवर नमूद केले आहे. याबाबत, मुलीच्या काकाला तीन दिवसांपूर्वी तडजोडीसाठी बोलावण्यात आले आणि तिथेच त्यांची हत्या करण्यात आली. आता बातमी अशी आहे की, ही दलित मुलगी तिच्या मामाचा मृतदेह एका रुग्णवाहिकेतून गावात आणत होती आणि वाटेत ती रूग्णवाहिकेतून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.