TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक
शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे दोन शिलेदार रिंगणात
![After the Lok Sabha elections, now election for 4 seats of Vidhan Parishad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Shivsena-ubt-780x470.jpg)
मुंबईः लोकसभा निवडणुकीचे राज्यातील मतदान नुकतेच पार पडलं आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. अशातच आता आणखी एक निवडणूक होणार आहे.विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाने त्यांचे दोन शिलेदार रिंगणात उतरवले आहेत. ठाकरे गटाकडून अनिल परब यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुढील महिन्यात 26 जूनला विधानपरिषदेची निवडणूक होणार असून 1 जुलैला निकाल जाहीर होणार आहे.