PCMC : महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवडा राबविणार – एकनाथ पवार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविणार आहे. उद्या (मंगळवारी) आरोग्य विभागाने स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली. तेव्हापासून दरवर्षी महात्मा गांधी जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येते. यंदाही महापालिकेने मंगळवारी सकाळी 10 वाजता पिंपरीच्या डाॅं. बाबासाहेब आंबेडकर चाैकातून स्वच्छता अभियानानिमित्त विद्यार्थ्यांच्या रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शगून चाैकापर्यंत असणार आहे.
त्यानंतर पुढील पंधरा दिवस स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक प्रभागाअंतर्गंत स्वच्छता मोहीम राबविल्या जाणार आहेत. शाळा, महाविद्यालय, सोसायट्या आणि इतर नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. या अभियानात महापालिका पदाधिकारी, नगसेवक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नगारिक सहभागी होणार असल्याचेही एकनाथ पवार यांनी सांगितले.