‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळतात’; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप
मुंबई : केंद्र सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ नाव दिलं आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र, या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला पाचारण करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर नाराज आहेत. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं.भाजप-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत.
हेही वाचा – ‘..म्हणून पोलिसांनी लाठीमार केला’; दीपक केसरकर यांचं मोठं विधान
आम्हाला फक्तं समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं.
भाजप-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत.#IndiaAlliance मध्ये… pic.twitter.com/fEYsNuPZf8
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 8, 2023
इंडिया अलान्समध्ये येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात? लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.