‘अजित पवारांना चक्की पिसिंग म्हणायचे आता किसिंग..’; ठाकरे गटाची खोचक टीका
मुंबई : अजित पवार यांनी काही आमदरांसह शिंदे-फडणवीसांना पाठिंबा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रूपयांचा जलसिंचन घोटाळा केला, असा आरोप केला. यानंतर अजित पवार सत्तेत स्थापन झाले असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी खोचक टीका केली आहे.
‘सामना’तून देवेंद्र फडणवीसांना सांभाळून राहण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत विचारलं असता अंबदास दानवे म्हणाले, राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या एक व्यक्तीच्या हाताखाली काम करावं लागतंय. ज्या व्यक्तीवर ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला. बैलगाडीभर पुरावे घेऊन जायचं होतं. ते अजित पवार चक्की पिसिंग म्हणायचे आणि आता अजित पवारांचं किसिंग चालू आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.
हेही वाचा – ‘गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा’; डॉ. नीलम गोऱ्हे
औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहात का? असा सवाल विचारला असता. ते म्हणाले, शिवसेनेत इच्छेला काही अर्थ नाही, असं माझं मत आहे. मुळात संघटनेत इच्छा असूच नये. व्यक्तिला इच्छा, आकांक्षा असावी, परंतु, शिवसेनेचं नेतृत्व इतकं सक्षम आहे की, त्यांना माहिती आहे कोणाला काय करावं, कोणाला कोणत्या जागेवर बसवावं, त्यांना सगळी माहिती आहे. त्यांना आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर लोकसंभेचा त्यांचा अभ्यास आहे. संघटेत इच्छेचा विषय नसतो, संघटनेत नेतृत्वाचा जो आदेश आहे त्याला महत्त्व असतं. संघटनेला जे आवश्यक आहे ते शिवसैनिक म्हणून करणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्या इच्छेला अर्थ नसतो आणि तो नसावा.