‘राहुल गांधींनी मणिपूर पेटवण्याचं काम केलं’; स्मृती इराणींचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरून संसदेत विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी मणिपूर पेटवण्याचं काम केलं, असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.
पश्चिम बंगालच्या काँग्रेस खासदार अमी याग्निक यांनी स्मृती इराणी आणि अन्य महिला मंत्री मणिपूर हिंसेवर कधी बोलणार? असा सवाल उपस्थित केला. या प्रश्नावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी संतापल्या. त्यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.
हेही वाचा – खबरदारी म्हणून एनडीआरएफचे पथक सातारा जिल्ह्यात दाखल
When will you have the guts to discuss Rajasthan,
When will you have the guts to discuss Chhattisgarh,
When will you have the courage to talk about what's happening in Bihar,
When will you have the courage to talk about the Red Diary… pic.twitter.com/reDcgZhcrT
— BJP (@BJP4India) July 26, 2023
स्मृती इराणी म्हणाल्या की, राजस्थान, छत्तीसगड आणि बिहारमील घटनांवर बोलण्याची हिंमत तुमच्यात कधी येणार? लाल डायरीबद्दल बोलण्यास तुमच्यात हिंमत आहे का? काँग्रेस शासित राज्यांत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात बोलण्याची हिंमत आहे का? असा सवाल उपस्थित केला. राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये जात पेटवण्याचं काम केलं, यावर तुम्ही कधी बोलणार आहात? असंही स्मृती इराणी म्हणाल्या.