‘राज साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद पडले, आता माझ्यामुळे..’; टोल प्रकरणावर अमित ठाकरेंचं विधान
मुंबई : मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात आली. ते समृद्धी महामार्गावरून नाशिकच्या दिशेने निघाले होते. यानंतर संतप्त मनसैनिकांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोड केली आहे. यावरून अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित ठाकरे म्हणाले की, रात्री साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर मला नाशिकला काम असल्याने मी नाशिककडे निघालो. सिक्युरिटी दिवसभर बरोबर असल्याने त्यांना शिर्डीचा थांबायला सांगितलं. कोपरगावहून समृद्धी महामार्गावरून नाशिककडे निघालो आणि सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटला माझी गाडी थांबवली.
हेही वाचा – अभिनेते किरण माने यांच्या सेक्स विषयीच्या पोस्टनं वेधलं लक्ष; वाचा सविस्तर
गाडीला फास्टॅग असतानाही तो रॉड खाली आला. तो टोलनाक्याचा काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम होता. टोलनाक्यावरील कर्मचारी सुद्धा अत्यंत उद्धट होते. तर मॅनेजरला त्यांनी फोन केला तेव्हा तो सुद्धा तशाच भाषेत बोलत असल्याचं दिसलं. दहा मिनिटे थांबवल्यावर मला त्या ठिकाणाहून सोडण्यात आलं आणि मी नाशिकला हॉटेलवर पोहोचलो तेव्हा कळलं की टोलनाका फोडण्यात आला आहे. साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एकाची भर पडली आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.