मणिपूर मुद्यावरून विरोधी पक्षातील महिला आमदार आक्रमक; विधानसभेतून सभात्याग!
मुंबई : मणिपूरमधील हिंसाचार आणि दोन महिलांवरील बलात्कार प्रकरणाबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे वेळ मागितला. परंतु, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही परवानगी नाकारली. यानंतर विरोधी पक्षांतील महिला आमदार आक्रमक झाल्या. या आमदारांनी अधिवेशनातून सभात्याग करत निषेध व्यक्त केला.
आमदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, मणिपूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तिथे दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. त्या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे वेळ मागितली. परंतु आम्हाला बोलू दिलं नाही. मणिपूरच्या घटनेचा देशभरातील लोक निषेध करत आहेत. आम्हाला वाटतं की, विधीमंडळाच्या माध्यमातून याबाबत एक ठराव झाला पाहिजे. त्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. मणिपूर सरकारचा धिक्कार झाला पाहिजे. यासंदर्भात ठराव व्हावा, अशी भावना आम्ही व्यक्त केली. परंतु आम्हाला बोलायची संधी मिळाली नाही. विधानसभा अध्यक्षांनी पाच मिनिटंसुद्धा आम्हाला दिली नाहीत.
हेही वाचा – तक्रार करा अन् १०० रूपये मिळवा, PMPML चा नवा फंडा!
This is an insensitive, heartless government that sheds crocodile tears after 3 months of continued violence in #Manipur. What happened to those women is unforgivable and yet this government feels no shame. The Manipur government has no moral right to continue.
Today at the… pic.twitter.com/aPySAkKccA
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 21, 2023
काँग्रेसच्या आमदार योशमती ठाकूर म्हणाल्या, या देशात महिलांचा सन्मान होत नसेल तर मोठं महाभारत घडणार आहे, हे सत्य आहे. आम्ही महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. परंतु या विधीमंडळाने आम्हाला एक सेकंदही बोलू दिलं नाही. हीच का आपल्या देशातील लोकशाही? खरंतर ही लोकशाही नव्हे हुकूमशाही आहे.