उधळलेल्या ‘बिग बुल’च्या गुन्ह्यांची चौकशी करणार का? सामनातुन केंद्र सरकारला सवाल
केंद्र सरकार ‘बिग बुल’ अदाणी यांना मिठी मारून बसले आहे
मुंबई : केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्सव्यवसाय मंत्रालयाने प्रेमवीरांना सल्ला देत १४ फेंब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ साजरा करावा, असं आवाहन केलं आहे. यावरून शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. सरकार एकीकडे जनतेला गाईला मिठी मारा असे फर्मान सोडत आहे आणि दुसरीकडे स्वत: बिग बुल अदाणी यांना मिठी मारून बसले आहे, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनातुन करण्यात आली आहे.
देशातील शेतकरी आज पशुधनाचा सांभाळ कसा करायचा, स्वत:च्या पोरांचं पोट भरायचं की पशुधनाचं, या विवंचनेत आहे. त्यांची ही विवंचना दूर करणे राहिले बाजूला, मोदी सरकार एकीकडे जनतेला गाईला मिठी मरा असे फर्मान सोडते आहे आणि दुसरीकडे स्वत: बिग बुल अदाणी यांना मिठी मारून बसले आहे, अशी टीका सामनातुन करण्यात आली आहे.
देशात शेतकरी पशुधनाचा संभाळ कसा करायचा, स्वत:च्या पोरांचे पोट भरायचे की पशुधनाचे या विवंचनेत आहे. त्याची ही विवंचना दूर करणे राहिले बाजूला, मोदी सरकार एकीकडे जनतेला ‘गाईला मिठी मारा’ असे फर्मान सोडते आहे आणि दुसरीकडे स्वत: बिग बुल अदानी यांना मिठी मारून बसले आहे. अदानी हे शेअर बाजारातील बिग बुल असेल तरी मोदी यांच्यासाठी ते होली काऊ आहेत. तसे नसते तर या होली काऊसाठी त्यांनी इतका आटापिटा केला नसता. इकडे गोमात चारा-पाण्याशिवाय हंबरते आहे आणि मोदी सरकार बिग बुलच्या दाणापाण्याचे पाहात आहे, जनतेला व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी गाईला मिठी मरायला सांगत आहे. चारा-पाण्याशिवाय हंबरणाऱ्या गाईला मिठी मारल्याने, उधळलेल्या बिग बुलच्या गुन्ह्यांची चौकशी मोदींचे सरकार करणार आहे काय?, असा सवाल सामनातुन केंद्र सरकारला केला आहे.