चंद्रकांत पाटीलांना भीम आर्मीचा इशारा, म्हणाले तुम्ही येथे येऊ नये
नाटक नौटंकी करत कोरेगाव भीमा येथे आलात तर शाईने आंघोळ घालू
मुंबई : बहुजन महापुरुषांचा अवमान करणारे 1 जानेवारी ला भिमा कोरेगाव विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आल्यास शाईने आंघोळ घालू असा इशारा भीम आर्मीने दिला आहे. जातीयवादी लोक महापुरुषांचा अवमान करत आहेत. त्याच्याबद्दल अपशब्द काढत आहेत. ते चंद्रकांत पाटील असो किंवा राम कदम असो किंवा इतर कोणी असो. त्यांनी कोरेगाव भीमा येथे येऊ नये अशी नम्र विनंती आहे त्यांना. तरी सुद्धा नाटक नौटंकी करत आपण आलात तर शाहीने आंघोळ घातली जाईल, असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.
1 जानेवारी 0218 ला भिमा कोरेगावला आलेल्या लाखो अनुयायी अभिवादनासाठी आले होते त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला. यावेळी महाराष्टाचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणीस हे होते. त्यांनी या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक केली नाही. आताही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. भिमा कोरेगावातील जेवढ्या लोकांवरती केसेस झाल्या त्यांच्यावरील केसेस मागे घेतल्या गेल्या नाहीत.
यासोबतच आत्ता काही नेत्यांनी महापुरूषांचा अपमान केलेला आहे. त्याचबरोबर राम कदम हे म्हणतात की ज्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीचे समर्थन केलं त्यांना घरात घुसुन मारू. माझं या लोकांना एवढच आव्हान आहे की जर तुम्हाला महापुरूषांची विचारधारा मान्य नाही तर तुम्ही 1 जानेवारीला भिमाकोरेगावला येऊ नका, असं अशोक कांबळे म्हणाले.