राज्य सरकारने वाईन निर्णय मागे घेतला नाही तर आमरण उपोषण करणार – अण्णा हजारे
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडीने वाईनविषयी घेतलेला निर्णय मागे घेतला नाही तर आपण आमरण उपोषणाला बसणार असा इशारा देणारे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे.
या पत्रामध्ये अण्णा हजारे यांनी महाराष्ट्र सरकारच्या मॉलमध्ये वाईन विक्रीस ठेवण्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे. वाईन माॅलमध्ये विक्रिस ठेवण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर आमरण उपोषणाला बसेल अशा आशयाचे पत्र आण्णा हजारे यांनी लिहले आहे. आण्णा हजारे यांनी हे पत्र ३ फेब्रुवारीला लिहले होते. पण अजून मुख्यमंत्री उद्घव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोणतेही उत्तर या पत्राला देण्यात आलेले नाही. त्यामुळे आण्णा हजारे यांनी आणखी एक पत्र सरकारला लिहल आहे. आण्णा हजारे वाईन सुपर मार्केट मध्ये उपलब्ध करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आण्णा हजारे यांनी दिला आहे.