सिंधू सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांची खासदार संजय राऊत घेणार भेट
![Opposition has started demanding resignation - Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Samana-Sanjay-Raut-criticises-BJP-over-Bhandara-Hospital-tragedy-comment-over-Mahavikasaghadi.jpg)
नवी दिल्ली – गेली जवळपास 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. अनेकदा चर्चा होऊन देखील अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. कृषी कायदे मागे घेण्याच्या मुद्यावर शेतकरी आक्रमक झाले आहे. एकीकडे देशव्यापी चक्का जामची शेतकऱ्यांनी घोषणा केली आहेत, सोबतच सरकारसोबत देखील चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे.
वाचा :-‘ती’ शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हे – संजय राऊत
आता शिवसेना खासदार संजय राऊत सिंधू बॉर्डरवर दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. याबाबत राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली होती. आता संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट करत ते दुपारी 1 वाजता गाझीपूर येथील शेतकरी आंदोलकांना भेट देणार असल्याचे सांगितले आहे.कृषी कायद्याच्या विरोधात मुंबईत देखील आंदोलन झाले होते. या आंदोलनाला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. आता संजय राऊत स्वतः शेतकरी आंदोलनाचे केंद्र असलेल्या सिंधू बॉर्डरवरील शेतकऱ्यांना भेटून आपला पाठिंबा देणार आहेत.
महाविकास आघाडीने शेतकऱी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठिशी ठाम ऊभे राहीले. शेतकऱ्यांची तडफड व अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्ष प्रमुख मा.ऊध्दव ठाकरे यांच्या सूचनेवरून आज सिंधु सीमेवरील आंदोलक शेतकर्यांना भेटत आहे.
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत.@OfficeofUT @PawarSpeaks @AUThackeray
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 2, 2021
राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली की, महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे.