संजय राऊत बिथरलेत, त्यांना मानसोपचारतज्ज्ञांची गरज- आशिष शेलार
मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला केला. तसंच, त्यांनी सामना अग्रलेखातूनही भाजपवर निशाणा साधला. शिवाय, ईडीच्या कार्यालयाला भाजपचे हेडक्वार्टर असल्याचे पोस्टरही लगावले. त्यामुळे राऊतांनी एकूण संपूर्ण भूमिका भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे भाजपनेही राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. ईडीची नोटीस आल्यानंतर राऊत बिथरलेत, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज असल्याची बोचरी टीका भाजप नेते आशिष शेलार
वाचा :-शिवसेना नेते संजय राऊत यांना भाजप नेत्यांनी घेतलं धारेवर, म्हणाले…
“संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यापासून संजय राऊत ज्याप्रकारे लिहित आहेत किंबहुना वक्तव्यं करत आहे त्यावरुन ते बिथरल्याचं दिसत आहेत. त्यांना तात्काळ मानसोपचार तज्ज्ञाला दाखवण्याची गरज आहे”, अशी टीका शेलार यांनी केलीय.
“संजय राऊतसाहेबांना माझा मैत्रीचा सल्ला असेल की त्यांनी लवकरात लवकर एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करुन घ्यावेत म्हणजे ते ठीक होतील”, असं म्हणत शेलारांनी राऊतांवर शरसंधान साधलं. राऊतांची गेल्या काही दिवसांपासूनची विधाने पाहता त्यांना भाजपद्वेषाने पछाडलंय, असं शेलार म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, “संजय राऊत यांची वक्तव्ये पाहिली असता त्यांना भाजपविरोधाशिवाय काहीच दिसत नाही, हे स्पष्ट होतं. माझं त्यांना मित्र म्हणून सल्ला असेल की त्यांनी तात्काळ एखाद्या चांगल्या डॉक्टरकडून उपचार करुन घ्यावा. त्यासाठी महापालिकेने प्रभादेवीला चांगलं हॉस्पिटल सुरु करावं.”