भाजपा किसान मोर्चातर्फे कृषी विधेयकाबाबत जनजागृती
- शहरअध्यक्ष संतोष तापकीर यांचा पुढाकार
पिंपरी | प्रतिनिधी
केंद्र सरकारने कृषी सुधारणा विधेयक आणले आहे. ते विधेयक नेमके काय आहे, या बाबत भाजप किसान मोर्च्याच्या वतीने जनजागृती केली जात आहे. विधेयकाची माहिती असणारे पत्रक, फ्लेक्स व प्रत्यक्ष लोकांना भेटून हि जागृती केली जात आहे. किसान मोर्च्याचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संतोष तापकीर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
केंद्र सरकारने कृषी सुधारणा विधेयक २०२० आणला आहे. या विधेयकाविरोधात शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन छेडले आहे. तर हे विधेयक नेमके काय आहे ? सर्वसामान्यांना याचा फायदा आणि तोटा काय आहे, या बाबत सर्वसामान्य अनभिज्ञ आहेत. सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजप किसान मोर्च्याने पुढाकार घेतला आहे. शहराध्यक्ष संतोष तापकीर यांच्या नेतृत्वाखाली कृषी सुधारणा विधेयकाची जनजागृती सुरु करण्यात आली आहे. त्याबाबतचे जनजागृती करणारे पत्रक त्यांनी काढून त्याचे घरोघरी वाटप सुरु केले आहे.
या पत्रकामध्ये शेतीसाठी तीन नवे कोणते कायदे आहेत याबाबत माहिती दिली आहे. तसेच हे कायदे कधी अंमलात येणार, कायदा करण्याचा सरकारचा उद्देश, या पैकी महत्वाचा कायदा कोणता याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या बरोबरच या कायद्यानुसार कोण कोणासोबत करार करेल, यात शेतकऱ्यांचा काय फायदा आहे, किती प्रकारचे करार करण्यात येतील, याची माहिती दिली. शेतकरी आणि कंपनी करार करताना आणखी कोण असतील हे सांगितले आहे. या सह अनेक प्रकारची सविस्तर माहिती दिली आहे. हे पत्रक घरोघरी वाटले जात आहे. यासह लोकांना भेटून देखील या बाबत माहिती देत असल्याचे शहराध्यक्ष संतोष तापकीर यांनी सांगितले.