breaking-newsराष्ट्रिय
मोन्सेन्टो कापूस बियाणे लागवड करणाऱ्यांवर कारवाईचा धोका
नवी दिल्ली : मोन्सेन्टो कंपनीने अनुवांशिकपणे विकसित केलेल्या (GM) आणि अप्रमाणित असलेल्या कापूस बियाणांची सध्या अनेक भारतीय शेतकरी उघडपणे लागवड करत आहेत.
भारताने पहिल्यांदा सन २००२ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा जीएम कापूस बियाणांना परवानगी दिली आणि त्यानंतर सुधारित वाणाला २००६ मध्ये परवानगी दिली. यामुळे तंतू क्षेत्रात देश जगातील सर्वाधिक उत्पादन घेणारा आणि दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार झाला आहे.
पण, रॉयल्टी मिळण्यावरून शासनाशी झालेल्या वादामुळे अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे २०१६ मध्ये आधुनिक प्रजाती मोन्सेन्टोनंतर दुसऱ्या कोणत्याही नव्या प्रजाती उपलब्ध नव्हत्या.
जीएम कापूस वगळता भारताने अजूनपर्यंत कोणत्याही इतर ट्रान्सजेनिक पिकाला सुरक्षेच्या मुद्द्यावरून परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.