breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
#CoronaVirus: सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता
नवी दिल्ली: Coronavirus च्या महासाथीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशी घ्यायची, घ्यायची की नाही यासाठी महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून गोंधळ झाला होता. शेवटी राज्य सरकारने परीक्षा ऐच्छिक ठेवण्याची घोषणा केली आहे. आता केंद्रीय पातळीवर विद्यापीठ अनुदान मंडळ (UGC) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. COVID चा उद्रेक अनेक राज्यांमध्ये नव्याने वाढतोय हे लक्षात घेत जुलैमध्ये होणाऱ्या विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. इंजिनिअरिंगसह सर्व वर्षांच्या कॉलेजच्या परीक्षा होणार नाहीयेत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षही ऑक्टोबरशिवाय सुरू होणार नाही, असं PTI ने म्हटलं आहे.