breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: …तर कोरोनाऐवजी लॉकडाउनमुळे अधिक लोकांचा मृत्यू होईल; नारायण मुर्तींनी व्यक्त केली भीती
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मुर्ती यांनी लॉकडाउनवर चिंता व्यक्त केली आहे. “लॉकडाउन पुढेही सुरू राहिल्यास करोनामुळे नाही तर उपासमारीमुळे भारतात जास्त मृत्यू होतील,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. “करोना हा इतर आजारांप्रमाणे आपण आता स्वीकारायला हवा आणि लोकांना कामावर येण्यास परवानगी द्यायला हवी. मात्र त्याचवेळी याचा संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता असणाऱ्यांची काळजीही घ्यायला हवी,” असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.