breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Waraginestcorono:कोरोनातून बरे होवून 1,188 रुग्ण घरी परतले
मुंबई. कोरोनाबधितांची संख्या वाढत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून ते आता रविवारपर्यंत हजारावर गेले आहे. राज्यात रविवारी ४४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ११२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, १९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी मुंबई येथील १२, पुणे महानगरपालिका येथे ३, तर २ मृत्यू जळगाव, १ सोलापूर शहरात, तर १ लातूर येथे झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ८०६८ झाली असून एकूण ३४२ जणांचा बळी गेला आहे. तर, एकूण ८ हजार ६८ रुग्णांपैकी १ हजार १८८ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. रविवारी झालेल्या मृत्यंूपैकी ११ पुरुष, तर ८ महिला आहेत.