#CoronaVirus: “सध्या महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची नाही तर अनुभवी देवेंद्र फडणवीसांची गरज”
महाराष्ट्रात करोनानं थैमान घातलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर विषाणूंचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांनी काही निर्णयही घेतले आहेत. पण भाजपा नेते निरंजन डावखरे यांनी उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना महाराष्ट्राला सध्या अनुभवी देवेंद्र फडणवीसांची गरज आहे असं म्हटलं आहे. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.
निरंजन डावखरे यांनी काय म्हटलं ?
निरंजन डावखरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की “सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे”.
सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे.#MaharashtraNeedsDevendra
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) March 19, 2020