आपल्या मुलांच्या लग्नात पळून गेलेले विहिण-व्याही अखेर परतले…काय होती यांची कहाणी? पहा…
गुजरातच्या सुरत शहरात काही दिवसांपूर्वी प्रेमाचं एक अनोखं प्रकरण समोर आलं होतं. इथे मुलांच्या लग्नापूर्वी मुलाचे वडील आणि मुलीची आई पळून गेले होते… या प्रकरणामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं…
आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे… मुलांच्या लग्नापूर्वी अचानक गायब झालेलं हे विहिण-व्याही अखेर परतले आहेत. त्यांनी पोलिसांसमोर हाजरीही लावली. मात्र, महिलेच्या पतीने तिला स्वीकारण्यास नकार दिला आहे. पतीने नकार दिल्यानंतर महिलेचे वडील तिला घ्यायला पोलीस ठाण्यात पोहोचले…
सुरत येथील 48 वर्षीय व्यक्तीच्या मुलाचं लग्न 46 वर्षीय महिलेच्या मुलीशी होणार होतं. येत्या फेब्रुवारी महिन्यात हा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, आपल्या मुलांच्या लग्नापूर्वीच मुलाचे वडील आणि मुलीची आई पळून गेल्याचा विचित्र प्रकार घडला…
हे दोघे अनेक काळापासून एकमेकांना ओळखायचे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, नंतर या महिलेचं नवसारी येथील हीरा कारागिराशी झालं. बऱ्यााच कालावधीनंतर हे दोघे एकमेकांना भेटले ते विहिण आणि व्याही म्हणून. लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. मात्र, या दरम्यान या दोघांनाही जूनं प्रेम आठवलं आणि ते कुणाचीही पर्वा न करता पळून गेले होते.