पवना धरणात बुडून मुंबईच्या दोन तरुणांचा मृत्यू
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पवना धरण परिसरात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या मुंबईतील दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमेय दिलीप राहते ( वय २५) व तेजस रवि पांगर ( वय २२ दोघेही रा. काळाचौकी, अभ्युदयनगर, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी (दि.१५) पवना धरण परिसरात अमेय व तेजस हे त्यांच्या अन्य दोन मित्रांसोबत पवना धरण परिसरात फिरायला आले होते. दुपारी दोनच्या सुमारास सर्वजण पाण्यात पोहण्याकरिता उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडुन दोघांचा मृत्यू झाला. घटनास्थळाकडे आलेल्या इतर पर्यटकांनी अमेय व तेजस यांना पाण्यातून बाहेर काढले.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे सहायक फौजदार सुनील बाबर करत आहेत.