breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार; राज्यपालांची फडणवीसांना सूचना

मुंबई | महाईन्यूज

महाराष्ट्राच्या राजकारणात आज भूकंप पहायला मिळालेला आहे. आज अचानक पहाटे राष्ट्रपती राजवट उठवून राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या घडामोडींमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून शरद पवारांनाही धक्का बसला आहे. 

या पार्श्वभुमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. अशावेळी भाजपाला बहुमतासाठी 39 मतांची गरज आहे. यामुळे अजित पवार यांच्याबरोबर किती आमदार आहेत आणि भाजपा आणखी किती आमदारांची मते मिळवू शकते यावर सारी गणिते अवलंबून आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button