शेतकरी कर्जमाफीची नवीन तारीख समोर! आता या दिवशी खात्यात जमा होणार पैसा

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच तांत्रिक अडचणीने मोठा खोडा घातला. दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण ते हवेतच विरले. आता पुढील दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही महत्त्वाची माहिती कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यापूर्वी तांत्रिक अडचणीचा मुद्दा समोर आणला होता. 4 ऑगस्ट रोजीपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरूवात होणार होती. पण अडथळा आल्याने शनिवारी अथवा रविवारी कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होईल. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल.
पहिल्या टप्प्यात कमी रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. युद्धपातळीवर ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 12 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येईल असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. कर्जमाफीच्या तीन याद्या जाहीर होणार आहे. ज्यांची पहिल्या यादीत नावे आली नाहीत. त्या शेतकऱ्यांनी संयम बाळगावा. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल टाकू नये असे आवाहनही भरणे यांनी केले.
हेही वाचा – 2000 रुपयांच्या UPI पेमेंटवर MDR चार्ज कोण भरणार? अखेर सरकारनेच दिलं उत्तर
आतापर्यंत 17 लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यादीत नाव आल्यावर पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम हस्तांतरीत होणार आहे. गरजू आणि आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी योजना आहे. त्यातून 96 हजार करदात्या शेतकऱ्यांना आणि इतर अपात्र अशा जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतून बाद करण्यात आले आहे. त्यांच्या अकाऊंटमध्ये छदामही जमा होणार नाही. सध्या तांत्रिक अडचण दूर करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा होईल.
अनेक ठिकाणी युरियासोबत विनाअनुदानित खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे. ती खरेदीची दुकानदार सक्ती करत आहेत. याविषयीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारने शासन परिपत्रक काढले आहे. असा प्रकार करणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ कडक कारवाईचे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.





