ताज्या घडामोडीमुंबई

राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीकरणाला विरोध 

6 जुलैला भव्य मोर्चाचे आयोजन

मुंबई : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली. मात्र, राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर कायम आहेत. राज्यातील शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्रानुसार पहिलीपासून हिंदीच्या अंमलबजावणी सुरू आहे आणि त्यालाच राज ठाकरे यांचा विरोध आहे. राज ठाकरेंचा विरोध संपवण्यासाठी दादा भुसेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. मात्र, भेटीनंतर दादा भुसेंनी स्पष्ट केले की, राज ठाकरे हे त्यांच्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत. आता राज ठाकरे यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली असून सरकारला हिंदी सक्तीविरोधात चांगलाच मोठा इशारा दिला आहे.

राज ठाकरेंनी 6 जुलै सकाळी 10 वाजता हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सर्व पक्षांनी या मोर्चात सहभागी व्हावी, असेही त्यांनी म्हटले आहे. यासोबतच रविवारीच या मोर्चाचे आयोजन केले असून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले. त्रिभाषा विरोधात राज ठाकरे आता मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय. भुसेंना मला भेटायचे असेल तर आझाद मैदानात भेटावे. हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी, असल्याचे थेट राज ठाकरेंनी म्हटले.

हेही वाचा –  राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट दिलासा

हिंदी सक्तीवरील तोडगा नाहीच, दादा भुसे यांनी सांगितले राज ठाकरेंसोबतच्या भेटीमध्ये काय घडले. पुढे बोलताना राज ठाकरे हे म्हणाले की, दादा भुसेंनी त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. ही भाषिक आणीबाणी आम्ही स्वीकारणार नाहीत. हिंदीची सक्ती लहान मुलांवर लादता येणार नाहीये. मुळात म्हणजे आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाहीये. शिक्षणमंत्र्याची भूमिका अमान्य आहे. जोपर्यंत सक्ती मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन असेल. या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असल्याचे परत एकदा म्हणताना राज ठाकरे दिसले.

आमचा विरोध हिंदी सक्तीला आहे आणि राहणार असल्याचे ठणकावून सांगताना राज ठाकरे दिसले. महाराष्ट्रात हिंदी सक्तीला विरोध, राज ठाकरेंसह चर्चा करणार, बैठकीनंतर दादा भुसेंची प्रतिक्रिया कोणत्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे भुसेंकडे नव्हती. 6 तारखेच्या मोर्चाबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, सर्व राजकिय पक्षांना माझे आवाहन असेल की, त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे आणि या मोर्चात कोणत्याही पक्षाची झेंडे नसणार आहेत, तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. जे शिक्षण तज्ज्ञ, साहित्यिक असतील त्यांच्यासोबतही आम्ही बोलणार आहोत, त्यांना पत्र जाणार आहेत. सर्वांना त्या मोर्चात बोलवणार आहोत, पालकही त्या मोर्चामध्ये असणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button