breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

HSC Exam | उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु, पेपरला जाताना ही काळजी घ्या..

HSC Exam 2024 | महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा ही उद्यापासून म्हणजेच बुधवार २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. शिक्षण मंडळाकडून या परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर अर्धा तास आधी पोहचावे असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. तसेच बारावीची परीक्षा तब्बल १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी देणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

परीक्षेला जाताना ही काळजी अवश्य घ्या!

१. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान अर्धा तास अगोदर पोहचणे गरजेचे आहे.

२. पेपरला जाताना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले वेळापत्रक घेऊन जाणे गरजेचे आहे.

३. ज्या विद्यार्थ्यांचा पेपर सकाळ सत्रात आहे अशा विद्यार्थ्यांनी सकाळी १०.३० वाजता परीक्षा केंद्रावर जाणे गरजेचे आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचा पेपर दुपार सत्रात आहे अशा विद्यार्थ्यांनी दुपारी २.३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

हेही वाचा        –        मनोज जरांगेंच्या वक्तव्यांवरून छगन भुजबळ आक्रमक; म्हणाले.. 

४. सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सकाळी ११.०० वाजता देण्यात येणार आहे तर दुपार सत्रातील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दुपारी ३.०० वाजता देण्यात येतील.

५. मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षी देखील बारावीच्या परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात येणार आहे.

६. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस दिलेल्या सूचनांचे वाचन करावे लागणार आहे.

७. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी पेन, पेन्सिल, पट्टी, स्वतःचे घेऊन जावे.

८. सर्वात महत्वाचं म्हणजे पेपर सोडवताना विद्यार्थ्यांनी लाल पेनाचा वापर चुकूनही करू नये.

९. तसेच पेपर ला गेल्यावर स्वतःच्या बैठक क्रमांकावर बसला आहेत याची खात्री करावी.

१०. या सर्व गोष्टी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर सोडवण्यास शांततेत सुरुवात करावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button