सुपर ओव्हरमध्ये भारताने सलग दुसरा सामना जिंकला…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-173.png)
वेलिंग्टन येथील चौथ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूजीलंडचा दुसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. पहिल्यांदाच सलग दुसऱ्या टी-20मध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळाली. भारताने न्यूजीलंडला 166 धावांचे आव्हान दिले होते मात्र न्यूजीलंडचा संघ 165 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि या मालिकेतील सलग दुसरा सामना टाय झाला. यानंतर खेळल्या गेल्या सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने 13 धावा काढल्या. भारताने हे आव्हान सहज पूर्ण केले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Capture-75.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/kn-williamson.jpg)
गेल्या सामन्यात देखील भारतीय संघाने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या हॅमिल्टनच्या तिसऱ्या टी-20मध्ये सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवर थरारक विजय मिळवला होता. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 180 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना मर्यादित 20 षटकांत न्यूझीलंडच्या फलंदाजांना 179 धावा करता आल्या. त्यामुळे टाय झालेल्या सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने दिलेले 18 धावांचे आव्हान रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने पूर्ण करुन भारताला मालिकाही जिंकून दिली.