breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
संयुक्त राष्ट्राच्या स्वरुपात बदलाची गरज- पंतप्रधान
नवी दिल्ली | संयुक्त राष्ट्राच्या ७५ व्या सत्रादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलती परिस्थिती पाहत संघटना स्वरुप आणि प्रासंगिकतेवर प्रश्न उपस्थित केले. मी १३० कोटी भारतीय जनतेची भावना मांडण्यास आलोय. १९४५ ला परिस्थिती वेगळी होती. आज वेगळी आहे.
त्या वेळेची आव्हान आणि आवश्यकता वेगळी होती. आज संपूर्ण जगासमोर वेगळं आव्हान आहे. पण ज्या हेतूने संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली तो हेतू आजही आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.