breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

वर्षा बंगल्यामधल्या ‘त्या’ भिंतीवरील मजकूराचं रहस्य उलगडलं, अमृता फडणवीस यांनी दिलं उत्तर

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवसस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यातील भिंतींवर काही अपशब्द लिहिल्याचे प्रकरण डिसेंबर महिन्यात समोर आलं होतं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर काही दिवसांमध्येच हे प्रकरण उघडकीस आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. भाजपा रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स’ अशा वाक्यांबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावातील अद्याक्षरे लिहून काही अपशब्द लिहिण्यात आले होते. मात्र आता या भिंतीवरील मजकुरासंबंधात माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला महिलादिनानिमित्त दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी भिंतीवरील मजकुरासंदर्भात भाष्य केलं आहे.

वर्षावरील भिंतींवरील मजकुरासंदर्भात स्पष्टीकरण देताना अमृता यांनी तो मजकूर कोणी लिहिला याबद्दल आम्हाला काहीच माहिती नसल्याचं स्पष्ट केलं. “जेव्हा आम्ही वर्षा बंगला खाली केला. सर्व काही तपासलेलं होतं. मात्र लहान मुलांना सवय असते कधी कधी रेघोट्या ओढायची भिंतीवर. आमच्या मुलीच्या बऱ्याच मैत्रिणी घरी यायच्या जायच्या. आम्ही बंगला सोडताना सर्व रुम तपासल्या तेव्हा तेथे काहीच नव्हतं. मात्र खाली कर्मचाऱ्यांच्या खोल्या (सर्व्हट क्वॉटर्स) आहेत. तिथे काही असल्यास मला त्याचा अंदाज नाही,” असं अमृता म्हणाल्या.

तसेच “आमच्या मुलीने हा मजकूर लिहिल्याचही बोललं जात होत मात्र आमच्या मुलीने तो मजकूर लिहिला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं…“वर्षावरील भिंतीवर लिहिलेल्या मजकूर हा राजकीय विषय बनवण्याची गरज नव्हती. मुलांच्या मनात आहे ते त्यांनी निखळपणे लिहिलं. राजकारण्यांना यावर भाष्य करण्याचा काय अधिकार आहे?,” असा सवालही अमृता यांनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button