breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
महाविकास आघाडीच्या सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव
मुंबई | महाईन्यूज
गेल्या महिनाभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला बहुमत सिध्द करणे खूप कठीण बनले होते. अखेर महाविकास आघाडीने आज (शनिवार) विश्वासदर्शक ठराव जिंकला. उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरिक्षाच मानली जात होती. दुपारी २ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर तासाभरात ही चाचणी पार पडली. या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहाचे कामकाज पाहिले. सरकारला १६९ आमदारांनी समर्थन दिले. तर, ४ आमदार तटस्थ राहिले. भाजपच्या सर्व आमदारांनी यावेळी सभात्याग केल्याने विरोधात शून्य मतदान झाले.