breaking-newsमहाराष्ट्र

महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प रखडण्याची शक्यता…

रत्नागिरी : जिल्ह्यातील महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा नाणार प्रकल्पाला स्थानिकांच्या विरोधा असल्याने  हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत चालल्याचं अंदाज एका वृत्तसंस्थेनं वर्तवला आहे. सौदी अरामको या जगातल्या आघाडीच्या तेल उत्पादक कंपनीबरोबर 44 अब्ज डॉलर्सचा हा प्रकल्प उभारण्याचा करार नुकताच करण्यात आला.

भारताच्या पेट्रोलजन्य पदार्थांच्या गरजेच्या पूर्ततेसाठी अत्यावश्यक तसेच स्थानिकांना प्रचंड प्रमाणात रोजगार मिळवून देणारा असं वर्णन सरकारनं या प्रकल्पाचं केलं होतं. परंतु तब्बल 15 हजार एकर जमिन या प्रकल्पासाठी आवश्यक असून आत्तापर्यंत एक एकर जमिनही अधिग्रहित होऊ शकलेली नाही. रत्नागिरी भोवतालच्या 14 गावांमधील शेतकऱ्यांनी या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला देसाईंप्रमाणेच ठाम विरोध केल्याचं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. प्रकल्प तडीस न्यायचा असेल या गावातल्या लोकांचं स्थलांतर करावं लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button