breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुढील तीन तासांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मुंबई | महाराष्ट्रातील विविध भागांत ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे जवळपास सर्वच धरणे भरली आहेत तर नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर कायम पहायला मिळत आहे. त्यातच आता राज्याताली काही भागांत पुढील तीन तासांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे.

आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे, राज्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात पुढील तीन तासांत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने बुधवारी रात्रीच कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. तर यासोबतच सांगली, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button