breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
पालघरमध्ये रेल्वेच्या धडकेत दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
नेहमीप्रमाणे पहाटे धावण्याच्या सरावासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांपैकी दोघांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. बोईसर रेल्वे पुलाखाली ही दुर्दवी घटना घडली.
माध्यमांतील वृत्तानुसार, रविवारची सुट्टी असल्याने धावण्याच्या सरावासाठी तीन शाळकरी मुले पहाटे पाच वाजता घरातून बाहेर पडले. दरम्यान, यांपैकी दोन जण बोईसर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर उभे होते. तर एकजण बाजूला उभा होता, तेवढ्यात एक रेल्वे त्या मार्गावरुन गेली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.