नव्या वर्षात मुंबई लोकलबाबत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, म्हणाले…
नवीन वर्षात देखील लोकल सर्वसामान्यांसाठी धावणार का? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून मुंबई लोकल सेवा बंद आहे. पण मागील काही दिवसांत कोरोना परिस्थिती नियंत्रण येत असल्यामुळे महिला आणि काही कर्मचारी वर्गांसाठी लोकल सुरू करण्यात आली. तरी सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे सेवा सुरू करण्यात आलेली नाही.
वाचाः 30 जानेवारीला एल्गार परिषद : बी. जी. कोळसे पाटील
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नव्या वर्षात कोरोना रुग्णांच्या संख्येवरून लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
नव्या वर्षात कोरोना रुग्णांची संख्या काय आहे ते आम्ही बघणार आहोत. जर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली नाही तर लोकल ट्रेनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्कीच सकारात्मक विचार करतील. आम्हाला ठावूक आहे की, लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. सध्या सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पण याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.