breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

…तर कोणी माय का लाल निवडून येणार नाही : अजित पवार

मुंबई | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आमदार फुटीची चर्चा रंगली आहे. मात्र चार पक्षातील तीन पक्ष एकत्र आले तर कोण माय का लाल निवडून येणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी मी भाजपला मदत करेन असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. बी वाय सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

अजित पवार म्हणाले, “निवडणूक झाली झाली त्या दिवसाची परिस्थिती आणि आज 13 नोव्हेंबरची परिस्थिती यात जमीन आस्मानचा फरक आहे. सगळे आमदार आपापल्या पक्षासोबतच राहतील. सगळे आपापल्या पक्षासोबतच राहतील. एखाद्या आमदाराने दबावाखाली राजकीय भूमिका घेतली आणि तिथे निवडणूक लागेल. जर ए, बी, सी हे ती पक्ष असतील. ‘ए’चा आमदार फुटला, तर ‘ए’ पक्ष जो उमेदवार देईल, त्याला ‘बी’ आणि ‘सी’ पाठिंबा देतील. चार पक्षातील तीन पक्ष एकत्र आले तर कोण माय का लाल निवडून येणार नाही.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button