ज्योतिषाला भविष्य नीट समजत नाय, पण चंद्रकांत पाटलांना अचुक भविष्य समजते – राजू शेट्टी
सांगली – ज्योतिषाला भविष्य समजत नाही, पण महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांना अचूक भविष्य समजते. अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महसूल मंत्री चंद्रकात पाटलांना टोला लगावाला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या निवडणूकीतील विजय आणि आकडेवारीच्या विधानाबाबत शेट्टी यांनी हा निशाणा साधत ईव्हीएमवर पुन्हा एकदा संशय व्यक्त केला आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.
भाजपाचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी निशाणा साधला आहे. अनेक भविष्यवेते, ज्योतिष यांना निवडणूक निकालाचे अंदाज आणि भाकीत चुकली, पण भाजपा नेत्यांचे हे भाकीत अचूक ठरले. त्यामुळे जोतिष्यांना भविष्य समजले नाही, पण भाजपा नेते आणि विशेषतः महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे भविष्य अचूक ठरले. ते जे बोलतात ते घडू लागले आहे. त्यामुळे अचूक भविष्य सांगण्याचे टेक्निक त्यांच्याकडे आहे. काळाच्या ओघात त्यांचे टेक्निक समोर येईल असं स्पष्ट करत पुन्हा एकदा ईव्हीएमवर शेट्टी यांनी संशय व्यक्त केला. त्याच बरोबर सर्व विरोधक ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन करत आहेत. लवकरच ईव्हीएम मशीन हटावसाठी देशात जनआंदोलन उभे राहिले असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.
तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साखर उद्योगाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा सरकारवर राजू शेट्टी यांनी यावेळी टीका केली. साखर उद्योगात आलेली मंदी आणि शेतकऱ्यांना न मिळणारी एफआरपी याला सर्वस्वी केंद्र सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. 2 वर्षांपुर्वी जागतिक बाजार पेठेत साखर उद्योगात मंदी होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कच्ची साखर आयत करण्यात आली. परिणाम देशात साखरेला देशानंतर्गत चांगली स्थिती असताना आयात धोरणामुळे आज देशातील साखर उद्योग मंदीत आला आहे. त्यामुळे देशात 25 हजार कोटी शेतकऱ्यांची थकबाकी आहे. त्यामुळे याचा पुढील हंगामातही परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.