breaking-newsराष्ट्रिय

केंद्र सरकारने वाढवली हरभरा आणि लसूण खरेदीची मुदत

नवी दिल्ली : शेती उत्पादनांच्या खरेदीसाठी शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि राजास्थानातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र शासनाने केला आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने महाराष्ट्रात हरभऱ्याची १३ जून पर्यंत आणि राजस्थानमध्ये लसणाची खरेदीची मुदत २० जून पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ही दोन्ही पिके २०१७-१८ च्या रब्बी (हिवाळा) हंगामातील आहेत. सध्या ही पिके आधारभूत किंमत योजनेनुसार खरेदी केली जात आहेत. पण, बाजारात त्यांचा भाव आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button